प्रत्येक हाताला काम, कामाप्रमाणे दाम
लोकांना जसं अन्न, वस्त्र, निवारा, प्राथमिक आरोग्य आणि शिक्षणाची संधी आवश्यक असते तसा रोजगार आवश्यक असतो. महाराष्ट्रातल्या काम करण्याची इच्छा आहे अशा प्रत्येकाला पुरेसं, समाधानाचं आणि त्याच्या कौशल्यानुसार योग्य काम मिळालंच पाहिजे यासाठी विशेष कायदा करायला हवा. त्यात रोजगाराचा अधिकार प्रत्येकाला आहे हे मान्य करूच पण त्यासाठी आवश्यक अशा संस्थाही उभारायला हव्यात.
यामध्ये सर्वात महत्त्वाची असते ती आकडेवारी. महाराष्ट्र राज्यात नक्की किती बेरोजगार आहेत, याबद्दलची इथ्यंभूत माहिती राज्याकडे असायला हवी. याशिवाय नवीन व्यवसाय उभे करणार्याह लोकांचीही यादी राज्याकडे असायला हवी.
योग्य माणसाला योग्य मोबदल्यात, त्याच्या कौशल्याला साजेसं काम मिळायला हवं.
आपला नम्र
युवराज येडूरे राधानगरी विधानसभा मतदारसंघ
www.yuvrajyedure.comBy: Yuvraj Ramchandra Yedure