शासन कारभार चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर त्यासाठी लोकप्रतिनिधींची कामे, जबाबदारी आणि कार्यकक्षा निश्चित हव्या!
भारतीय लोकशाहीमध्ये मतदार तीन स्तरांवर आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो. केंद्राच्या लोकसभेसाठी खासदार, राज्याच्या विधानसभेसाठी आमदार आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचायत सदस्य. या सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्राबद्दल जनेतेचे प्रश्न मांडणे आणि योग्य ते कायदे बनवणे अपेक्षित असते. कायदा बनवण्यासाठी मतदान करणं हे झालं एक काम. पण या व्यतिरिक्त कोणतेच काम 'केलेच पाहिजे' यामध्ये स्पष्टता नाही.
आपले लोकप्रतिनिधींना जबाबदार आणि उत्तरदायी हवे असतील तर त्यांच्या कामांमध्ये स्पष्टता असायला हवी.
आपला नम्र
युवराज रामचंद्र येडूरे
(महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
भुदरगड,आजरा,राधानगरी विधानसभा मतदारसंघ
www.yuvrajyedure.com
www.mnsblueprint.orgBy: Yuvraj Ramchandra Yedure