जनता आपल्या लोकप्रतिनिधीचे योग्य मूल्यांकनही करू शकत नाही. मुल्यांकन न झाल्याने लोकप्रतिनिधीच्या कामाबद्दल खात्री वाटत नाही.
भारताच्या घटनेत,कोणत्याही विधानसभेच्या पुस्तिकेत, कोणत्याच शासकीय नियमांमध्ये आपल्या कोणत्या लोकप्रतिनिधींनी कोणती कामे करायची हे लिहिलेले नाही. ते तसे लिहिलेले नसल्याने आमदार, खासदार, किंवा नगरसेवकांचे मुल्यांकन करता येत नाही. काय करायचे हे निश्चित नसल्यामुळे काहीच केले नाही तरी लोकप्रतिनिधींना जबाबदार धरू शकत नाही.
आपल्या लोकप्रतिनिधीने काय करायचे हे जनतेलाही माहित नसल्यामुळे जनतेला भूलवणे सोपे होते. जनता आपल्या लोकप्रतिनिधीचे योग्य मूल्यांकनही करू शकत नाही. मुल्यांकन न झाल्याने लोकप्रतिनिधीच्या कामाबद्दल खात्री वाटत नाही.
खरंतर बस थांबे बांधणे हे काम खासदाराचे नाही, पण आपल्याकडे नगरसेवकांची कामे देखील खासदार त्याच्या निधीमधून करत असतो. आणि जनतेचीही अशीच अपेक्षा असते की तो लोकप्रतिनिधी असला तर त्याने आपला शेजारच्या रस्ता साफ करण्यापासून ते परराष्ट्र धोरण ठरवण्यापर्यंत सर्व कामे करायला हवीत.
आपला नम्र
युवराज रामचंद्र येडूरे
(महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
भुदरगड,आजरा,राधानगरी विधानसभा मतदारसंघ
www.yuvrajyedure.com
www.mnsblueprint.orgBy: Yuvraj Ramchandra Yedure